रत्नागिरीत शिवसैनिकांचा पुढाकार: बिपिनजी बंदरकर यांच्या पाठपुराव्यामुळे ‘संत संताजी जगनाडे महाराज उद्याना’चा मार्ग मोकळा.

Shabbir Vasta
2 Min Read

रत्नागिरी:
रत्नागिरी शहरातील तेलीआळी (आरक्षण क्रमांक ६१) येथे साकारत असलेल्या अद्ययावत उद्यानाला आता ‘श्री संत संताजी जगनाडे महाराज उद्यान’ असे नामाभिधान मिळणार आहे. शिवसेना शहर प्रमुख बिपिनजी बंदरकर यांच्या विशेष प्रयत्नातून आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सामंत साहेब यांच्या माध्यमातून मिळालेल्या निधीतून हे उद्यान साकारले जात आहे.
नगरपालिकेत ठराव मंजूर
   या उद्यानाला ‘श्री संत संताजी जगनाडे महाराज’ यांचे नाव देण्यात यावे, असा ठराव बिपिनजी बंदरकर यांनी नगरपालिकेत मांडला होता. या प्रस्तावाचा गांभीर्याने विचार करून, शिवसेनेच्या नगराध्यक्षा आणि नगरसेवकांनी हा विषय जनरल सभेच्या अजेंडावर घेतला. मंगळवार, दिनांक ३० जून २०२६ रोजी नगरपालिका सभागृहात झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला.
बिपिनजी बंदरकर यांची महत्त्वाची भूमिका
   तेली समाजाचे धडाडीचे नेते बिपिनजी बंदरकर यांनी या उद्यानाच्या निर्मितीपासून ते नामकरणापर्यंत अतिशय मोलाची भूमिका बजावली आहे. १९ तारखेला हा विषय अजेंड्यावर निघाल्यानंतर, ३० तारखेला तो सभागृहात मंजूर झाला.
इतर नगरसेवकांचे पत्र व प्रतिक्रिया
   ठराव मंजूर झाल्यानंतर काही नगरसेवकांनी या विषयावर पत्र दिल्याचे समोर आले आहे. मात्र, यावर आपली प्रतिक्रिया देताना शिवसेना शहर प्रमुख बिपिनजी बंदरकर यांनी स्पष्ट केले की, “एखादी गोष्ट रीतसर सभागृहात मंजूर झाल्यानंतर पत्र दिले जात नाही, ती प्रक्रिया आधी व्हायला हवी होती.”
     या निर्णयामुळे तेली समाजात आणि परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून, उद्यानाच्या माध्यमातून आधुनिक सोयीसुविधांसह संतांचे नाव कायमस्वरूपी स्मरणात राहणार आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *